Wednesday 11 July 2012

Expiry Date आलेली औषधं!!


औषधं त्यांच्या वैध कालावधीत घेतली तर तारक नाही तर मारक ठरतात. तशीच काहीशी अवस्था होती आपली वयाची 
बाविशी-तेविशी  ओलांडली कि. कारण Expiry Date जवळ आलेली असते ना!
प्रत्येक समारंभात लोक नजर ठेऊन असतात. उपदेशांचे डोस देणे सुरु होते.. प्रत्येक औषधाचा कडवट घोट घेतल्या नंतर जसा तोंडाचा वेडा वाकडा आकार होतो तसाच आपलं मूड 
वाकडा होतो असे विषय घरात निघाले कि. आणि मग आजवर दरवर्षी ज्या वाढदिवसाची आपण आवर्जून वाट पाहिलेली तो दिवस असा लवकर-लवकर का येतो? असं वाटू लागतं!  एकिकडे घरच्यांचं साम-दाम-दंड-भेद या चार हि नीतींच अवलंबन सुरु असतं आणि दुसरीकडे 
अगदी दोन तीन वर्षांपूर्वी लग्न झालेला  मित्र परिवार हि आपल्या अनुभवाचे बोल Expert Opinion असल्यासारखे  ऐकवत असतो.
जो तो ज्याच्या त्याच्या लेखी "वैध" असलेल्या कालावधीप्रमाणे आपली विल्हेवाट लावण्याच्या मागे असतो.

लग्न कुणाशी करावं हा तर नंतरचा भाग झाला, मुळात आजकाल लग्न करावं कि नाही यावरच आपलं एकमत होत नसतं. 
परिस्थितीअभावी अथवा परिस्थितीप्रभावी म्हणा, किंवा स्वत:ला वाटलं म्हणून अनेक जण आज एकटे राहात आहेत. प्रत्येकाची कारणं वेगळी, अनुभव वेगळे. हे प्रमाण जरी वाढलं असलं तरी तसं आजही हे समाजाला नं पटण्यासारखंच  आहे.

वेळेत लग्न आणि वेळेत मुल होणं is equal to successful life. हेच यशस्वी 
जीवनाचं समीकरण आज हि जोडलं जातं.
ज्याला त्याला फक्त आपल्याच लग्नाचा लाडू खायची घाई झालेली असते..
आहो 
पण फक्त लाडू वर थोडीच समाधान होतं  यांचं.. लाडू जिरत हि नसेल तोच पेढ्या साठी हात पुढे करतात (आजकाल तशी जिलेबी हि चालते म्हणा! ;) :P )


-पल्लवी वसंत डेंगळे 

Thursday 22 March 2012

Handle With Care!


तशी-काही-अशी आता उन्हाळयाची चाहुल लागली आहे, ऑफिस मधून घरी आल्यावर पटकन कोकम सरबत बनवलं.
प्यायला घेतलं आणि त्या काचेच्या ग्लासा कडे लक्ष गेलं. तसं स्टील च्या पेल्यात घेतलं तरी सरबताची चव तीच असते मग हा काचेच्या पेल्यात पिण्याचाच अट्टाहास का असावा?
आणि सहज एक गोष्ट जाणवली, माणसंही आपल्या आयुष्यात अशीच येतात ना काचेच्या ग्लासां सारखी, सेट मध्ये.. आणि ब-याचदा कितीही काळजीपूर्वक हाताळला तरी त्यातला एक-एक ग्लास फुटत जातो.. १२,६,४ चा सेट मोडतो.. कधी आपल्याच हातून निसटतो तर कधी इतर कुणाचा धक्का लागल्याने.. काहींशी विशेष जिव्हाळा असतो म्हणून तडा गेला तरी आपण ते सांभाळून ठेवतो! तर एखादा ग्लास काहीही न होता आपसूक च दीर्घकाळ टिकून राहतो..
जिवाला रुख-रुख लागते खरी पण आरंभ तेथे शेवट हा तर निसर्ग नियमच.
"आपल्यापरीने सांभाळणं" आपण एवढाच करू शकतो.
तसं थांबत काहीच नसतं. पुन्हा कुठून तरी एखादा नवा ग्लास सेट गिफ्ट येतो आणि आपल्या पुढच्या उन्हाळ्याची सोबत होतो......

Sunday 22 January 2012

Im A Daughter of "Best Dad"


Holding his hands I took first step of my walk..

He kept my secret from mom that I ate chalk..

He taught me riding bike.. He taught me driving car..

He is my best buddy.. He is my super-star..

He prepares tea for me when I’m studying mid night..

Always before there on the bus stop to receive me late night..

I really miss all those moments together we had..

I Proudly say that..Im A Daughter of "Best Dad"


-वसंतकन्या (Pallavi Vasant Dengale)